हिंसाचारानंतर PM मोदींचा मणिपूरमध्ये पहिलाच दौरा; जाणून घ्या 5 पॉईंटमध्ये त्यांच्या भाषणातील मुद्दे

PM Modi Manipur visit 2025 : मे 2023 मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 13 सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच मणिपूरला भेट दिली. मिझोरमपासून ईशान्य भारताचा दौरा सुरू केल्यानंतर, ते थेट मणिपूरमधील चुराचांदपूर येथे पोहोचले.

या दौऱ्यात त्यांनी 71,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मणिपूरच्या नावातच 'मणि' (रत्न) आहे आणि ते संपूर्ण ईशान्य भारताची चमक वाढवणारे आहे, असे सांगत त्यांनी जनतेला शांतता आणि विकासाचा संदेश दिला.

PM Modi in Manipur

'मणिपूरच्या लोकांना माझा सलाम'

चुराचांदपूर येथील एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या लोकांच्या धैर्याचे आणि आत्म्याचे कौतुक केले.

मुसळधार पाऊस असतानाही मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनतेचे आभार मानत ते म्हणाले, "मणिपूरची ही भूमी धैर्य आणि शौर्याची भूमी आहे... मी मणिपूरच्या लोकांच्या आत्म्याला सलाम करतो."

हिंसाचारग्रस्त मदत शिबिरांना भेट दिल्यानंतर त्यांना एक वेगळा आत्मविश्वास जाणवला. त्यांनी सांगितले की, "हिंसाचाराने ग्रासलेल्या या सुंदर प्रदेशात आता आशा आणि आत्मविश्वासाची एक नवीन पहाट उगवत आहे.

PM मोदींच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

1. 'आशा आणि आकांक्षेची भूमी'

पंतप्रधान मोदींनी मणिपूरचे वर्णन 'आशा आणि आकांक्षेची भूमी' असे केले. त्यांनी हिंसाचारातून बाहेर पडून एक नवीन सुरुवात करण्याचे आवाहन केले.

2. विकासासाठी शांतता आवश्यक

"शांतता असेल तरच विकास कुठेही होऊ शकतो," यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या ११ वर्षांत ईशान्य भारतातील अनेक वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्यात आले, कारण लोकांनी शांतता आणि विकासाला प्राधान्य दिले, असे त्यांनी सांगितले.

3. 7,300 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प

पंतप्रधानांनी चुराचांदपूर येथे ७,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे विशेषतः डोंगराळ भागातील आदिवासी समाजाचे जीवनमान सुधारेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

4. कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक विकासावर भर

कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी शेकडो गावांपर्यंत रस्ते पोहोचवण्यात आले आहेत, तर जिरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्ग लवकरच इम्फाळला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडेल, असे त्यांनी सांगितले. तसेच, शिक्षण आणि आरोग्यावर भर देताना चुराचांदपूरमध्ये प्रथमच वैद्यकीय महाविद्यालय बांधले गेले आहे आणि 'आयुष्मान भारत' योजनेअंतर्गत २.५ लाखांहून अधिक लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

5. 'मी तुमच्यासोबत आहे'

पंतप्रधानांनी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गावर पुढे जाण्याचे आवाहन केले. सरकारने विविध गटांशी करारासाठी चर्चा केली असून, हा संवाद आणि आदराचा प्रयत्न आहे. शेवटी, "मी तुमच्यासोबत आहे... भारत सरकार मणिपूरच्या लोकांसोबत आहे," असे सांगत त्यांनी मदतीची ग्वाही दिली. पंतप्रधान मोदींचा हा दौरा मणिपूरमधील लोकांना विकासाची आश्वासने देणारा आणि शांततेचे आवाहन करणारा एक महत्त्वाचा प्रयत्न होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+