होळीची सुरुवात कशी झाली? काय आहे शिव आणि कामदेवाची या सणामागची कथा? वाचा रंजक कहाणी...
हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणून होळी या सणाचा उल्लेख केला जातो. या वर्षी २५ मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात रंगांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचा सण होलिकेच्या दहनाने सुरू होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग आणि गुलालाने होळी खेळली जाते. या दिवशी हिंदू धर्माचे लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात आणि एकमेकांना प्रेमाच्या रंगात भिजवून आपला आनंद व्यक्त करतात. होळी सणाबाबतच्या अनेक कथा सांगितल्या जातात, परंतु होळी का साजरी केली जाते हे फार कमी लोकांना माहिती असेल. याच होळीबाबतची एक कथा आपण पाहूयात...

कामदेव- शिव यांची कथा
हिंदू धर्मातील एका पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीला महादेवाशी लग्न करायचे होते. परंतु ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने माता पार्वतीकडे लक्ष दिले नाही. पार्वतीने महादेवाचे लक्ष वेधण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले. अखेर पार्वतीच्या प्रयत्नांना पाहून कामदेव तिच्या मदतीला आले. कामदेवाने महादेवांवर पुष्प बाण सोडला. या पुष्पबाणांनी महादेवाची तपश्चर्या भंग झाली. त्यामुळे महादेव क्रोधित झाले. यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेव जळून खाक झाले. यानंतर भगवान शिव यांनी पार्वतीकडे पाहिले. हिमवनाची कन्या पार्वतीची पूजा यशस्वी झाली आणि शिवाने तिला पत्नी म्हणून स्वीकारले.
रतीने केली आराधना
कामदेवाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी रती हिला अकाली वैधव्य भोगावे लागले. त्यानंतर रतीने शिवाची आराधना केली. जेव्हा भगवान शिव तिच्या आराधनेवर प्रसन्न झाले तेव्हा रतीने त्यांनी तिचे दुःख सांगितले. भगवान महादेवाने जेव्हा ही घटना समजून घेतली तेव्हा त्यांनी पार्वतीच्या मागच्या जन्माची कहाणीही डोळ्यासमोर आणली. कामदेव निर्दोष होता, हे महादेवांनी जाणले. मागील जन्मात दक्ष संदर्भात महादेवांना अपमान सहन करावा लागला होता. त्याच्या अपमानाने त्रस्त होऊन, दक्षाची मुलगी सतीने आत्महत्या केली. तीच सती पार्वती म्हणून जन्माला आली आणि या जन्मातही तिने शिवाची निवड केली.
कामदेवाला केले जिवंत
त्यानंतर भगवान शिवाने कामदेवाला पुन्हा जिवंत केले. त्याला मनसिज असे नवीन नाव दिले. तो म्हणाला की आता तू अशरीरीय आहेस. त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा होती. लोकांनी मध्यरात्री होळी जाळली. सकाळपर्यंत वासनेची अशुद्धता त्याच्या आगीत जळून गेली होती आणि प्रेमाच्या रूपात प्रकट झाली होती. कामदेव, शरीररहित अवस्थेत, नवीन निर्मितीला प्रेरणा देऊन आपला विजय साजरा करू लागला. हा दिवस होळीचा दिवस आहे. आजही अनेक ठिकाणी रतीचा विलाप लोकगीत आणि संगीतातून व्यक्त केला जातो.












Click it and Unblock the Notifications