कोण आहे ती एकमेव पाकिस्तानी महिला, जिला आसामचे मुख्यमंत्री परत तिच्या देशात पाठवू इच्छित नाही?
Himanta Biswa Sarma on Pakistani Citizen in Aasam : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. आता या आदेशाची अंतिम मुदतही संपली आहे.
तरी देखील अशी शंका उपस्थित केली जात आहे की, भारतभरात अनेक पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. यापैकी एक पाकिस्तानी महिला देखील आसाममध्ये आहे. तथापि, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्या महिलेला त्यांना तिच्या देशात परत पाठवायचे नाही. त्यांनी यासाठी केंद्र सरकारला एक विनंती देखील केली आहे.

दिब्रुगडमधील एका समारंभात बोलताना, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सांगितले की, तिनसुकिया जिल्ह्यातील एका नागरिकाशी लग्न केल्यानंतर राज्यात फक्त एकच पाकिस्तानी महिला राहिली आहे. मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी सांगितले की, अलिकडच्या घडामोडी लक्षात घेता परदेशी नागरिकांच्या स्थितीबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारशी संपर्क साधलेला आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.
पाकिस्तानी नागरिकाला एलटीव्हीची आवश्यकता
गेल्या आठवड्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर, केंद्राने सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले.
सीएम सरमा म्हणाले, "तीनसुकिया जिल्ह्यात फक्त एक पाकिस्तानी नागरिक राहत आहे. तिचे लग्न एका स्थानिक पुरूषाशी झाले आहे. ती आसाममध्ये राहणारी एकमेव पाकिस्तानी नागरिक आहे आणि तिने दीर्घकालीन व्हिसासाठी (LTV) अर्ज केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही भारत सरकारला विनंती केली आहे की त्यांना परत पाठवावे की नाही हे स्पष्ट करावे. त्यांनी असेही म्हटले की या प्रकरणाव्यतिरिक्त, आसाममध्ये दुसरा कोणताही पाकिस्तानी नागरिक राहत नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेविषयी माहिती देणे टाळले.
4 दिवसांत 500 हून अधिक पाकिस्तानी परतले
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध काही कठोर निर्णय घेतले ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडण्यास सांगण्यात आले. या आदेशानुसार, काल, रविवार हा 12 श्रेणींअंतर्गत अल्पकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस होता आणि अटारी-वाघा सीमा क्रॉसिंगवर वाहनांच्या लांब रांगा दिसून आल्या.
आता पर्यंत किती पाकिस्तानी नागरिक परतले
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने व्हिसा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर, 24 एप्रिलपासून पुढील 4 दिवसांत 9 राजदूत आणि अधिकाऱ्यांसह 537 पाकिस्तानी नागरिक सीमा रेषेवरुन भारताबाहेर पडले आहेत. गेल्या 4 दिवसांत, 14 राजदूत आणि अधिकाऱ्यांसह एकूण 850 भारतीय पंजाबमधील सीमा ओलांडून पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.












Click it and Unblock the Notifications