मी आता न्याय देऊ शकणार नाही, कुणाचे मन दुखावले असेल तर मला माफ करा; निरोप समारंभात CJI भावूक
CJI DY Chandrachud Farewell : भारताचे मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा शुक्रवारी निरोप समारंभ पार पडला. त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी CJI यांनी समारंभपूर्वक कार्यक्रमात भाषण केले.
यावेळी बोलताना त्यांनी मे-2016 मध्ये जेव्हा त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती, त्या दिवसाची आठवण सांगितली. तर प्रत्येक जण यात्रेकरुसारखा असतो, असेही ते म्हणाले. तर या कार्यक्रमात बोलताना ते पुढे भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

CJI DY चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत. यामुळे 8 नोव्हेंबर हा त्यांचा सुप्रीम कोर्टातील शेवटचा कामकाजाचा दिवस होता. अशा परिस्थितीत सीजेआय चंद्रचूड यांच्या निरोपासाठी औपचारिक खंडपीठ बसले, ज्याचे थेट प्रक्षेपण झाले. डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली औपचारिक खंडपीठ होते. CJI सोबत, न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला, ज्येष्ठ वकील आणि CJI पद भूषवलेले न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनीही कार्यक्रमात भाग घेतला.
तर मला माफ करावे...
औपचारिक खंडपीठावर भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले- एवढ्या मोठ्या सन्मानाबद्दल तुमचे खूप खूप आभार, मी मोठा होत असताना माझे आवडते ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे मनापासून आभार मानू इच्छितो. आई म्हणाली मी तुझे नाव धनंजय ठेवले आहे, पण तुझ्या 'धनंजय' मधील 'संपत्ती' ही भौतिक संपत्ती नाही. मावळते सरन्यायाधिश शुक्रवारी त्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी औपचारिक खंडपीठाचे नेतृत्व करताना त्यांचे अंतिम भाषण केले. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर अनावधानाने 'कुणाला दुखावल्याबद्दल'त्यांनी माफी मागितली.
आपल्या निरोपाच्या भाषणात मावळते सरन्यायाधीश म्हणाले, न्यायालयानेच मला पुढे जाण्यास मदत केली आहे. आम्ही अशा लोकांना भेटतो ज्यांना आम्ही कदाचित ओळखत देखील नाही. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे आभार मानतो आणि पूर्वीसारखे कोणतेही प्रकरण नाही. जर मी कोर्टात कधी कोणाचे मन दुखावले असेल, मला माफ करावे अशी माझी इच्छा आहे.












Click it and Unblock the Notifications