सोमवारी रात्री कुठे दिसले ड्रोन? ऐनवेळी विमान दिल्लीत परतलं, नेमकं काय घडलं?
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, ड्रोन पुन्हा एकदा उत्तर भारतातील आकाशात घिरट्या घालू लागले आहेत. उधमपूर, सांबा, जालंधर आणि अमृतसर सारख्या संवेदनशील भागात सोमवारी रात्री ड्रोन दिसले आहेत, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत. दरम्यान, दिल्लीहून अमृतसरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानालाही शेवटच्या क्षणी दिल्लीला परतावे लागले.

उधमपूरमधील हवाई दल तळ आणि उत्तर कमांडवर एकाच वेळी सुमारे १५ ड्रोन दिसले. त्याच वेळी, कटरा दिशेने आणखी ५ ड्रोन घिरट्या घालताना आढळले. त्याआधी, जालंधरमधील सुरनासी गावाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर सैन्याने ताबडतोब कारवाई केली.
भारतीय लष्कराने पाकिस्तानी ड्रोन रोखले
सांबा सेक्टरमध्येही परिस्थिती गंभीर आहे. तिथे रात्रीच्या वेळी भारतीय सुरक्षा दलांनी अनेक पाकिस्तानी ड्रोन रोखले. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ड्रोन आकाशात लाल पट्टे बनवताना दिसत होते आणि काही वेळाने मोठे स्फोट झाले. सध्या सांबा येथील परिस्थिती शांत आहे, परंतु वीजपुरवठा खंडीत झाला होता
पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित
पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती तणावपूर्ण आहे. अमृतसर , होशियारपूर, दसुहा आणि मुकेरियन येथे खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता. अमृतसरच्या उपायुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की हे केवळ सुरक्षेच्या कारणास्तव उचललेले पाऊल आहे, घाबरून जाण्याची गरज नाही.
जालंधर डीसी म्हणाले की, सुरनासीजवळ ड्रोन दिसल्याची पुष्टी झालेली नाही, परंतु खबरदारी म्हणून काही भागातील दिवे बंद करण्यात आले आहेत. अशा ब्लॅकआउटचा उद्देश फक्त ड्रोन ट्रॅक करण्यास आणि थांबवण्यास मदत करणे आहे.
ब्लॅकआउटमुळे विमान वळवले
यामुळे दिल्लीहून अमृतसरला परतणाऱ्या इंडिगोच्या विमान सेवेवरही परिणाम झाला. हे विमान रात्री ९:४५ वाजता अमृतसरमध्ये उतरणार होते, परंतु ब्लॅकआउटमुळे ते परत दिल्लीकडे वळवण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
या सर्व घटना अशा वेळी घडत आहेत जेव्हा अलिकडेच भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने मोठी कारवाई केली होती, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.
यानंतर, पाकिस्तानने सीमेजवळ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने त्यांना योग्य उत्तर दिले. १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली, परंतु काही तासांतच पाकिस्तानने त्या कराराचे उल्लंघन केले आणि पुन्हा ड्रोनने हल्ला केला.
आता परिस्थिती पुन्हा नाजूक झाली आहे आणि सीमावर्ती भागात हाय अलर्ट आहे. अशा परिस्थितीत जनतेनेही सतर्क राहण्याची गरज आहे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications