अक्षम्य निष्काळजीपणा! दिल्ली आयएएस कोचिंग सेंटर दुर्घटनेला जबाबदार कोण, 3 जीवांचे कुणी घेतले बळी?
नवी दिल्ली - दिल्लीतील राजेंद्रनगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन उमेदवारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आयएएस परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवढी भीषण आणि दुर्दैवी तेवढीच निष्काळजी या कोचिंग सेंटर व्यवस्थापनाने केली आहे.
प्रश्न हा की, ज्यांनी भविष्याची स्वप्ने पाहत दिल्ली गाठली. त्यांच्याच नव्हे तर कुटुंबांची स्वप्नही उद्धवस्त झाली. या निष्पाप तीन जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण? या दुर्घटनेचे आरोपी कोण हा प्रश्न आहे. या दुर्घटनेनंतर आता काय उपाय करता येतील हाही प्रश्न तेवढाच मोठा आहे.

3 उमेदवारांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
- राऊ आयएस कोचिंग सेंटरची लायब्ररी ज्या ठिकाणी सुरू होती त्या ठिकाणी अशा घटना रोखण्यासाठी साधनसामग्री उपलब्ध नाही, दुसरीकडे नाल्यांची साफसफाई होत नव्हती.
- जुन्या राजेंद्र नगरमध्ये 10 हून अधिक कोचिंग सेंटर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व कोचिंग सेंटर्सच्या तळघरात लायब्ररी आहेत. याबाबत स्थानिकांनी तक्रारीही केल्या होत्या, मात्र या तक्रारी कधीच ऐकल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.
- वेळीच कारवाई झाली असती तर तीन जीव वाचले असते. अपघातानंतर एमसीडीची झोप उडाली. परिसरातून पाण्याचा निचरा होत असून नाल्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.
- हे वाचनालय बेकायदेशीरपणे सुरू होते, राऊ आयएएस कोचिंग सेंटरमध्ये किती घातक निष्काळजीपणा करण्यात आला हेही उघड झाले आहे.
- कोचिंग सेंटरच्या कम्प्लिशन सर्टिफिकेटमध्ये जे लिहिले होते त्याच्या नेमके उलटे काम येथे केले जात होते.
- गंभीर बाब म्हणजे कोचिंग सेंटरच्या तळघरात बेकायदेशीरपणे लायब्ररी बांधण्यात आली होती.
- तळघर पार्किंगसाठी वापरण्यात येणार असल्याचे प्रमाणपत्रात स्पष्ट लिहिले आहे. या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रानुसार, तळघर स्टोरेजसाठी वापरला जाईल, म्हणजे, प्रमाणपत्रामध्ये व्यावसायिक गोष्टींना परवानगी नव्हती.
- सर्वात आधी बेसमेंटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेली ही सर्व लायब्ररी बंद करावी.
- एमसीडीने हा प्रश्न ताबडतोब सोडवावा.
- मागच्या वेळी पाऊस पडला होता, त्यामुळे गाड्या तरंगत होत्या. एका वर्षात त्यांनी काय उपाययोजना केल्या, याचे ऑडीट व्हावे.
- दिल्लीच्या राजेंद्रनगरात जे घडले ते अक्षम्य आहे आणि यापुढे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे महापाप ठरु शकते त्यामुळे वेळीच उपाय सरकारने योजावेत.
- कोचिंग सेंटरचे ऑडीट, फायर ऑडीटसह अन्य तपासण्यांची गरज आहे.
- अनाधिकृत कोचिंग सेंटरवर कारवाई व्हायला हवी. कोचिंग सेंटर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट व्हायला हवे. बांधकाम, इमारत ढासळण्यासंदर्भातील ऑडीटचीही गरज आहे.
- दोषींवर कठोर कारवाई करावी.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य

मोठे शुल्क घेऊन सुविधांकडे दुर्लक्ष
युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क कोचिंग संस्था आकारतात. पण या विद्यार्थ्यांना मूलभूत सुरक्षेत कसर ठेवली गेल्याचे या घटनेवरुन दिसते. कोचिंग संस्थेकडून काही उपाय योजण्यात आले होते का..आग लागली अथवा दुर्घटना घडल्यास पुर्वनियोजित उपाययोजनांचा अभाव या दुर्घटनेवरुन दिसून येतो.

भाजप-आपमध्ये आरोप-प्रत्यारोप
दिल्ली सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असतानाच, भाजप आणि आम आदमी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता कोचिंग सेंटरचे मालक आणि समन्वयक यांना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी आणि इतर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन

मध्य दिल्लीच्या जुन्या राजिंदरनगर भागात मुसळधार पावसामुळे कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या तळघरात शनिवारी पाणी पोहचले. यात तीन युपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त विद्यार्थी दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) आणि कोचिंग इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाविरोधात निदर्शने करत आहेत.
पावसाळी उपाययोजना केल्या होत्या का?
महानगर पालिका आणि कोचिंक इन्स्टिट्यूट व्यवस्थापनावर सर्व जबाबदारी होती हे दिसून येते पण या दोन्ही संस्थांनी पावसाळ्यातील संभाव्य उपाययोजना केल्या होत्या का जर त्या केल्या असेल तर ही दुर्घटना का झाली आणि जर उपाययोजना केल्या नसतील तर का केल्या नाही, हेही चौकशीतून समोर येईल.
दिल्ली महानगर पालिका जबाबदार?
युपीएससी उमेदवारांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, या दुर्घटनेला "एमसीडी जबाबदार आहे. त्यांनी सुरक्षा उपायांची खात्री केली नाही. एमसीडी आणि आरएयू आयएएस दोघेही दोषी आहेत, त्यांना संयुक्तपणे जबाबदार धरायला हवे."










Click it and Unblock the Notifications