Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bihar Elections 2025 Marathi Analysis : बिहार निवडणुकीत काँग्रेसच्या मोठा पराभव का झाला? ही 5 कारणं

Bihar Elections 2025 Marathi Analysis : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये महागठबंधन आणि विशेषतः काँग्रेस पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. या पराभवासाठी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे नेतृत्व करणारे राहुल गांधी यांच्या अनेक गंभीर चुकांना राजकीय विश्लेषक जबाबदार धरत आहेत. स्थानिक समस्यांकडे झालेले दुर्लक्ष, गठबंधनमधील समन्वयहीनता आणि प्रचारातील गंभीर त्रुटी यामुळे पक्षाला मोठा फटका बसला. या पराभवाने काँग्रेसची विश्वासार्हता आणि संघटन क्षमता यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Bihar Elections 2025

१. बिहारच्या मुळ समस्यांपासून दुर

काँग्रेसच्या प्रचार अभियानात बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या मोठ्या राष्ट्रीय समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, परंतु बिहारच्या ग्रामीण मतदारांसाठी कळीचे असलेले कृषी संकट, पूर, स्थलांतर आणि आरोग्य यांसारखे स्थानिक मुद्दे प्रभावीपणे उचलले गेले नाहीत. याशिवाय, राहुल गांधींनी प्रचारात 'मत चोरी' च्या मुद्द्यावर जास्त जोर दिला, जो ग्रामीण मतदारांना आकर्षित करू शकला नाही. यामुळे मतदारांमध्ये असा संदेश गेला की, पक्षाला राज्याच्या वास्तविक समस्यांची पुरेपूर जाणीव नाही.

२. महागठबंधनमधील ताळमेळचा अभाव आणि जागावाटपाचा गोंधळ

महागठबंधनमध्ये जागावाटप निश्चित करताना काँग्रेसने दाखवलेला हट्टीपणा आणि सीट वाटपावर झालेला दीर्घकाळचा गोंधळ पराभवाचे एक मोठे कारण ठरला. काँग्रेसने अधिक जागा मागितल्या आणि शेवटपर्यंत काही जागांवर अंतिम सहमती झाली नाही. यामुळे आरजेडी आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एकसंधता निर्माण झाली नाही. नेतृत्वाच्या या निर्णयामुळे जमिनी स्तरावरच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले, ज्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर झाला.

३.निवडणूक प्रचार करण्यात झालेला अक्षम्य उशीर

राहुल गांधींचे निवडणूक प्रचारात उशिरा उतरणे ही एक मोठी रणनीतिक चूक मानली जाते. एनडीएने आपला निवडणूक नॅरेटिव्ह आणि प्रचारयंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू केली, तोपर्यंत काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व अपेक्षित वेगाने मैदानात उतरले नाही. या उशिरामुळे काँग्रेसला रणनीतिक फायदा मिळवण्याची संधी मिळाली नाही आणि मतदारांचा कल एनडीएच्या बाजूने झुकण्यास मदत झाली.

४. 'छठ पूजा' वादाचा विपरित परिणाम

निवडणुकीच्या ऐनवेळी छठ पूजा या बिहारमधील अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक सणाबद्दल पंतप्रधान मोदींवर केलेल्या विधानामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपने या विधानाला बिहारच्या जनतेच्या आस्थेशी खेळण्याचा प्रयत्न म्हणून भावनिक मुद्दा बनवण्यात यश मिळवले. यामुळे मतदारांना दुखावल्याचा नैरेटिव्ह तयार झाला आणि काँग्रेसच्या विरोधात मतदारांनी मतदान केले, ज्याचा परिणाम अनेक जागांवर दिसून आला.

५. जुन्याच चुकांमध्ये अडकलेले कमकुवत संघटन

काँग्रेसने या निवडणुकीतही आपल्या माजी चुकांची पुनरावृत्ती केली. पक्षाने निकालांनंतर ईव्हीएमवर खापर फोडण्यावर भर दिला, ज्यामुळे ते मतदारांमध्ये विश्वास आणि जबाबदारी दाखवण्यात अपयशी ठरले. याशिवाय, सोशल मीडियाच्या प्रचारावर जास्त लक्ष केंद्रित करून जमिनी स्तरावर बूथ आणि मतदान केंद्रांवर प्रभावी संघटन उभे केले नाही, ज्यामुळे एनडीएच्या तुलनेत काँग्रेसची तयारी खूपच कमकुवत ठरली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+