Bharat Bandh 9 July : उद्या 25 कोटी कर्मचारी, कामगार संपावर! काय बंद, काय सुरु राहणार जाणून घ्या
Bharat Bandh 9 July : देशात मोठ्या कालावधीनंतर भारत बंद पुकारण्यात आला आहे. बुधवारी (९ जुलै) रोजी देशातील २५ कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी सर्वसाधारण संपावर जाणार आहेत. १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी युनिट्सनी या संपाची हाक दिली आहे. कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम सर्व अत्यावश्यक सेवांवर दिसून येणार आहे.

का पुकारला जातोय बंद?
देशातील जवळपास प्रमुख दहा कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हा देशव्यापी संप करण्यात येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
काय आहेत कामगारांच्या मागण्या
कामगार संघटनांच्या मंचाने सांगितले की, त्यांनी गेल्या वर्षी कामगार मंत्र्यांना १७ कलमी मागण्यांचे निवेदन सादर केले होते. यामध्ये..
- सरकार गेल्या १० वर्षांपासून वार्षिक कामगार परिषद आयोजित करत नाही.
- चार नवीन कामगार संहिता लागू करून, सरकार कामगारांचे हक्क कमकुवत करत आहे.
- सामूहिक व्यवहार, संपाचा अधिकार आणि कामगार कायद्यांचे उल्लंघन गुन्हा मानला जात नाही, यासारख्या धोरणे कामगारांसाठी घातक आहेत.
- नोकऱ्यांचा अभाव, महागाई आणि घसरणारे वेतन यासारख्या समस्या वाढत आहेत. या सर्व मागण्यांवर सरकारने उपाय योजावेत असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
काय बंद काय राहणार सुरु?
- भारत बंदचा परिणाम संपूर्ण देशावर होऊ शकतो.
- बंदचा सर्व क्षेत्रांच्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
- बँकिंग
- विमा
- रेल्वे आणि इतर क्षेत्रांवर परिणाम
- टपाल सेवा
- कोळसा खाण
- राज्य वाहतूक
- कारखाने आणि इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
- बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित कामांवर परिणाम
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर म्हणाल्या की, आतापर्यंत अनेक मोठ्या शेतकरी आणि कामगार संघटनांनी संप प्रभावी करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. शेतकरी आणि ग्रामीण कामगारांनीही देशाच्या विविध भागात संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. NMDC लिमिटेड, इतर खनिजे, स्टील कंपन्या, राज्य सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी देखील संपात सामील होणार आहे. प्रमुख शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी श्रमिक संघटना देखील यात सामील होत आहेत. यापूर्वी, शेवटचा देशव्यापी संप १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुकारण्यात आला होता.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications