असं काय घडलं की 24 तासांत कैलाश गेहलोत BJPत सामील झाले, वाचा, स्वत: गेहलोत यांनी काय केले कथन
Kailas Gehlot Joins BJP : आम आदमी पार्टी (आप) आणि दिल्ली सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 24 तासांनंतर कैलाश गेहलोत यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. यावेळी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, गेहलोत यांनी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, आप पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू झाले आहेत का, या सर्वांची उत्तर स्वत:गेहलोत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहेत.

गेहलोत म्हणाले- माझ्यावर कोणाचाही दबाव नाही
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलाश गेहलोत म्हणाले- हा निर्णय रातोरात घेतला गेला, असा विचार लोक करत असतील. कोणाच्या तरी दबावाखाली निर्णय घेतला. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्यात कधीही दबावाखाली काम केलेले नाही. ईडी, सीबीआयच्या दबावाखाली मी हे कृत्य केल्याचे ऐकायला मिळत आहे, पण तसे नाही.
#WATCH | Delhi: After joining BJP, Kailash Gahlot says "I joined AAP with the purpose of serving the people of Delhi. The values for which we joined the Aam Aadmi Party were being completely compromised in front of my eyes. These may be my words but I guarantee that behind… pic.twitter.com/aNNBEcWpiO
— ANI (@ANI) November 18, 2024
जनसेवा हा एकमेव उद्देश होता
कैलाश गेहलोत म्हणाले की, वकिली सोडल्यानंतर मी आम आदमी पक्षात प्रवेश केला. ते अण्णाजींच्या काळाशी संबंधित होते. हजारो-लाखो कार्यकर्त्यांनी नोकरी आणि काम सोडले. आम्ही एका विचारधारेशी जोडलेले होतो, आम्हाला पक्ष आणि व्यक्तीमध्ये आशा दिसली. दिल्लीतील जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने ते सतत जोडलेले होते, राजकारणात येण्याचा हा एकच उद्देश होता.
ज्या मूल्यांसाठी त्यांनी पक्षात प्रवेश घेतला होता, त्या मूल्यांशी तडजोड होताना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे. ही माझी वेदना आहे आणि हीच हजारो-लाखो कार्यकर्त्यांची भावना आहे. ते आम आदमीच्या सेवेसाठी जोडले गेले होते, परंतु या आम आदमींना वाटते की ते विशेष झाले आहेत.
गेहलोत यांची केजरीवालांवर टीका
कैलाश गेहलोत यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कठोर शब्दात पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी पक्षावर जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आणि राजकीय महत्त्वाकांक्षेला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. कैलाश गेहलोत यांनी दावा केला आहे की AAP आपल्या मूळ तत्त्वांपासून आणि दिल्लीतील नागरिकांप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांपासून विचलित झाली आहे.
हे ही वाचा : कोण आहेत कैलाश गहलोत, किती आहे संपत्ती, दिल्ली निवडणुकीपूर्वीच केजरीलावांचा AAP पक्ष सोडला!
गेहलोत यांचा आप ते भाजप प्रवेश
कैलाश गेहलोत यांनी 2015 मध्ये दिल्ली सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि सलग तीन वेळा मंत्रीपद भूषवले. 'आप'मध्ये त्यांचा दर्जा नेहमीच उंच राहिला आहे. पण पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय आपमधील अंतर्गत कलह आणि नेतृत्वाविषयीचा असंतोष अधोरेखित करतो.












Click it and Unblock the Notifications