वजन कमी करण्यासाठी औषधे घेत आहात? होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम
weight loss : आजकाल वजन कमी करण्याच्या काही औषधांची खूप चर्चा सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी वजन कमी करण्यासाठी ही औषधे घेत असल्याचे बोलले जात आहे. या औषध कंपन्यांकडून असा दावा केला जात आहे की ही औषधे घेतल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते.
ब-याच जणांना कोणतीही मेहनत न करता लगेच वजन कमी करायचे असते. त्यामुळे या औषधांना रातोरात मागणी वाढली असून वजन कमी करण्यासाठी लोक या औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पण या औषधांमुळे वजन कमी होते का आणि दीर्घकाळापर्यंत ही औषधे घेतल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात का? हे जाणून घेऊया
ही औषधे कसे काम करतात?
खरं तक वजन कमी करण्याची औषधे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. यापैकी काही औषधे घेतल्याने, व्यक्तीला भूक कमी लागते आणि पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तो जास्त खाण्याची सवय सोडून देतो आणि कमी खातो. या फॉर्म्युल्याच्या मदतीने, एखाद्या व्यक्तीचे वजन एका आठवड्यात कित्येक किलोने कमी होते. याशिवाय काही औषधांमुळे तुम्ही खाल्लेल्या अन्नातील चरबी शोषून घेणे कठीण होते, म्हणजेच तुमचे शरीर अन्नातून चरबी शोषण्यास सक्षम नसते. यामुळे तुमचे वजनही कमी होते. काही औषधे शरीरातील हार्मोन्सप्रमाणे काम करतात जे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

एक्सपर्ट्स काय सांगतात?
काही फिटनेस एक्सपर्ट्सच्या मते ही औषधे तात्काळ प्रभाव दाखवून तुमचे वजन कमी करतात, परंतु काही काळाने ती घेणे बंद केल्यास वजन आपोआप वाढते. अशा परिस्थितीत औषधांच्या मदतीने नैसर्गिकरित्या वजन कमी करणे अधिक फायदेशीर आहे. तसेच, जेव्हा तुम्हाला औषधे घेतल्याने भूक कमी लागते तेव्हा तुमच्या शरीरात अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होत असते ज्यामुळे तुम्हाला थकवा येणे, अशक्तपणा जाणवू शकतो. त्याच वेळी, चरबीचे शोषण रोखणारे औषध घेतल्याने, शरीरात चरबीची कमतरता सुरू होते पण शरीराला विशिष्ट प्रमाणात चरबीची आवश्यकता असते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनत आहे. काही लोकांना व्यायाम आणि आहाराशिवाय वजन कमी करायचे असते आणि त्यासाठी औषधे घेणे सुरू केले जाते, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की ही औषधे काही काळ काम करू शकतात परंतु त्यांचे दुष्परिणाम देखील आहेत. त्यामुळे यकृत आणि किडनी खराब होऊ शकतात.
वजन कमी करण्याच्या औषधांचे दुष्परिणाम
-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
-शरीरातील साखर अचानक कमी होऊ शकते.
-आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात कमजोरी आणि थकवा येऊ शकतो.
- झपाट्याने वजन कमी केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचा वैद्यकीय इतिहास तपासून आणि काही महत्त्वाच्या चाचण्या घेतल्यानंतर हे औषध घ्या. तसेच, ही औषधे इतर औषधांच्या तुलनेत खूपच महाग आहेत, त्यामुळे ही औषधे नियमितपणे घेणे सोपे नाही आणि औषधे मध्येच बंद केल्याने तुम्ही पुन्हा जाड होऊ शकता.त्यामुळे अचानक वजन कमी करण्याऐवजी माफक प्रमाणात वजन कमी करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यासाठी सकस आहार आणि व्यायामाची मदत घेतली तर चांगले होईल.
-
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
अदानी टोटल गॅसकडून CNG आणि घरगुती PNG चे दर स्थिर; काही उद्योगांच्या पुरवठ्यात कपात -
Nitish kumar resigns : मोठी बातमी! नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; काय आहे कारण? वाचा -
शिंदेंचं सोलापूर 'कार्ड' अन् आंबेडकरी चेहऱ्याला संधी; राज्यसभेत ज्योती वाघमारेंना संधी, वाचा सविस्तर -
सावधान! महाराष्ट्राचा पारा चढला; पुढील 48 तास उष्णतेचा 'हाय अलर्ट', जाणून घ्या IMDचा अंदाज काय? -
बिहारच्या राजकारणात 'नितीश' युगाचे नवे पाऊल; राज्यसभेच्या रिंगणात CM, शहांनी फुंकले विजयाचे रणशिंग! -
भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही 'परवानगी'ची गरज नाही, विषय संपला ! -
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: भारत रचणार इतिहास! फायनलमध्ये 'या' 2 स्टार खेळाडूंचा पत्ता कट होणार? कारण काय, वाचा







Click it and Unblock the Notifications