महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव का झाला; वाचा पराभवाचे सखोल विश्लेषण
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सर्वात मोठा झटका बसला तो महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला. लोकसभा निवडणुकीत तब्बल तेरा खासदार निवडून आणून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पूर्ण धुवा उडाला. अवघे 16 आमदार निवडून आणण्यात पक्षाला यश आले यामागे संघटनेतील विसंवाद आणि सावळा गोंधळ कारणीभूत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1990 सालापासून अपराजित असलेले काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार बाळासाहेब थोरात, अमरावती जिल्ह्यातील वजनदार नेत्या यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. तर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोडक्यात बसवले आहेत. राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासारखे स्टार प्रचारक घेऊनही काँग्रेसची दुर्दशा झाली.

निवडणुका जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि महाविकास आघाडीत कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. लोकसभेत 13 जागा निवडून आल्यामुळे पक्षाचे नेते हवेत होते. आपणच मोठा भाऊ आहोत या थाटात काँग्रेसने सहकारी पक्षांना कस्पटा समान वागवले. खुद्द काँग्रेस अंतर्गतच प्रचंड विसंवाद असल्याचे दिसून आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या जबाबदारीचे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. आपली सत्ता येणार या भ्रमात असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षम्य चुका करून ठेवल्या.आणि त्याचे परिणाम सर्वत्र दिसून आले.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आला दिलेला पाठिंबा सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अचानक काढून घेतला. त्यामुळे महायुती बेबनाव असल्याचा संदेश संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. काँग्रेस एकदिलाने लढते आहे, असे कुठेही जाणवले नाही. पक्षाचा प्रत्येक नेता आपापल्या मतदारसंघात आपापली लढाई लढण्यात मश्गुल होता. संघटना किंवा पक्ष म्हणून आपल्याला लढायचे आहे, हे भानच कुणाला नव्हते. विकास आघाडी म्हणून जिंकून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच असल्याचा काँग्रेसचा पवित्रा होता.
अमित देशमुख, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, गोवाल पाडवी या तरुण नेत्यांनी पक्षासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील गट अलिप्त राहिला. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून झालेले राजकारण आणि उमेदवारांनी घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरली. तिथे उमेदवार मधुरिमा राजे, खासदार शाहू महाराज आणि स्थानिक नेते सतेज पाटील यांच्यातील विसंवाद जिल्हाभरात चर्चिला गेला. कोल्हापुरातील गोंधळाचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर झाले.
मैदानावरचे प्रश्न वेगळे असताना राहुल गांधी पुन्हा संविधान आणि अदानीचा मुद्द्यावरच घुटमळत राहिले. त्याचा निवडणुकीचा वातावरणावर कोणताही परिणाम झाला नाही. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यात स्थानिक नेते कमी पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. आणि बहुरंगी लढती देखील काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications