Vande Mataram debate : 'आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही', लोकसभेत असे बोलणारे खासदार कोण आहेत?
Vande Mataram Lok Sabha Debate: लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. विशेष करून राष्ट्रगीत व "वंदे मातरम" च्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत झालेल्या विशेष चर्चेदरम्यान मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व पक्षांच्या नेत्यांनी वंदे मातरम संदर्भात आपले विचार मांडले, परंतु खासदार सय्यद आघा रुहुल्लाह मेहदी यांच्या विधानाने वातावरण तापले. त्यांनी लोकसभेत "आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही" असे म्हटले. असे विधान करताच सभागृहात एकच गोंधळ उडाला अन् सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला. हे विधान करणारे खासदार कोण आहेत आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना आहे. चला तर त्या खासदारांविषयी जाणून घेऊाया सविस्तर

वंदे मातरम ला विरोध का?
खासदार सय्यद आघा रुहुल्लाह मेहदी यांनी लोकसभेत सांगितले की, "तुम्ही वंदे मातरम म्हणू शकता, आम्हाला त्याचा काही त्रास नाही; आम्ही त्याचा आदर करतो. पण तुम्ही ते गाऊ शकत नाही; तुम्ही आम्हाला ते गाण्यास भाग पाडू शकत नाही." त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण केले आणि राष्ट्रीय गाणे सक्तीचे करण्याच्या प्रयत्नाला तीव्र विरोध केला.
कोण आहेत खा. सय्यद आघा रुहुल्लाह मेहदी?
खासदार सय्यद आघा रुहुल्लाह मेहदी हे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (जेकेएनसी) पक्षाचे नेते आणि खासदार आहेत आणि सध्या ते श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा जिंकल्यानंतर त्यांनी संसदेत प्रवेश केला. त्यांना जेकेएनसीमध्ये एक बोलका नेता मानले जाते, त्यांनी कलम ३७० रद्द करण्यास तीव्र विरोध केला. ते जम्मू आणि काश्मीरमध्ये समावेशक, गैर-सांप्रदायिक राजकारणाचे समर्थन करण्यासाठी ओळखले जातात.
'वंदे मातरम्' हा धार्मिक मुद्दा का: ओवेसी यांचा सवाल!
लोकसभेत 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र भूमिका घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही आमच्या आईची पूजा करत नाही, आम्ही कुराणची पूजा करत नाही आणि इस्लाममध्ये अल्लाहशिवाय कोणीही देव नाही." ओवेसी यांनी सरकारवर देशभक्तीचे धर्मात रूपांतर केल्याचा आरोप केला.
त्यांनी घोषित केले की, "देश माझा आहे आणि आम्ही तो सोडणार नाही," आणि निष्ठेचे प्रमाणपत्र मागण्याविरुद्ध आवाहन केले. त्यांनी इशारा दिला की जबरदस्ती संविधानाच्या विरोधात असेल आणि भारताला स्वातंत्र्य आहे कारण आम्ही देश आणि धर्म यांची गल्लत केली नाही.












Click it and Unblock the Notifications