जयदीप आपटेच्या जामिनासाठी आठ दिवसांपासून प्रयत्न, ख-या सुत्रधारावर कारवाई कधी? संजय राउतांचा सवाल
मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठच महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे.
या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. चेतन पाटीलला काही दिवसांपूर्वी अटक झाली. पण जयदीप आपटेला फरार होता, काल रात्री पोलिसांनी कल्याण अटक केली. मात्र शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी जयदीप आपटेबाबत गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी सांगितले की, जयदीप आपटेच्या पाठीशी महाशक्ती असल्याने तो इतके दिवस पोलिसांना चुकवू शकला. पण शिवभक्तांचा दबाव आणि रेटा एवढा होता की, आपटेचे बॉसही त्याला वाचवू शकले नाहीत. जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होईल त्यांच्या जामिनाची ताबडतोब व्यवस्था करा, असे आदेश देण्यात आले होते, जयदीप आपटे याला लागणारी कायदेशीर मदतही ठाण्यातून पुरवली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यात हा बाजार मांडला आहे आणि जे षडयंत्र रचण्यात आले आहे, त्याचे सर्व सूत्रधार ठाण्यातच आहेत आपटेला देणारे सूत्रधार सरकारमध्येच आहेत. या सूत्रधारांवर कारवाई कधी होणार असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
ते कोर्टालाही 1500 रुपये पाठवतील
संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे सरकारवर निशाणा साधला, राज्यातील हे सरकार 1500 च्यावर जाणार नाही. स्वत 15 हजार कोटी ठेवतील. पण बहिणींना 1500, कर्मचाऱ्यांना 1500 देतील. त्यांचं 1500 चं लिमिट आहे. त्यांचा एक पेग 1500 चा आहे. त्याच्यावर ते जाणार नाही. आमच्याकडून कुणी कोर्टात गेलं नाही. कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. ते कोर्टालाही 1500 पाठवतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे
मुख्यमंत्री गडचिरोलीचा कायापालट करणार असं सांगत होते. आदिवासी आणि गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यापेक्षा या ठिकाणी खाण उद्योग आहे. त्याचा आर्थिक व्यवहार आपल्याला हातात राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा जवळ ठेवला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नेमले आहेत. आदिवासींचा विकास नाही. तर आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications