मराठा समाज असा झटका देईल की तुम्हाला पश्चाताप होईल! मनोज जरांगेंचा 'यांना' मोठा इशारा
छत्रपती संभाजीनगर - राज्य सरकार केवळ आश्वासन देत आहे, सत्ताधारी वेळ मारुन नेत आहेत. त्यांनी मराठा समजाच्या जीवाशी खेळू नये,अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होईल असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.
जिथे जायचे नाही तिथे कशाला नेता..
मनोज जरांगे म्हणाले, 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज एकत्र येणार असून निर्णय घेतला जाणार आहे. समाजाला आरक्षण न देण्याचा निर्णय सरकारने घेतला असेल तर आम्हालाही पडायचा निर्णय घ्यावाच लागेल. सत्ताधारी समाजाला दार वेळी हुलकावणी देत आहेत. ज्या क्षेत्रात आम्हाला जायचे नाही. त्या राजकीय क्षेत्रात जाण्याची वेळ मराठा समाजावर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आणली आहे.

मराठ्यांच्या जीवाशी खेळू नका..
मनोज जरांगे म्हणाले, सरकार फक्त आरक्षण देऊ असे आश्वासन देत आहे. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्याला देखील वेळमर्यादा वाढवून द्यावी. सरकारने आश्वासनं न देता थेट मागण्या मान्य कराव्या. मराठा समाजाच्या गोर गरीब मुलांवर अन्याय केला जात आहे. समाजाच्या जीवाशी सरकारने खेळ खेळू नये. अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरी जावे लागेल.
आमची धग मराठवाड्यापुरती नाही
जरांगे म्हणाले, आमच्या आरक्षणाची धग मराठवाड्यापुरती नाही. मुंबईतही आमदारांना बसणे कठीण झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी इकडे तोंड खुपसू नयेत.. गिरीश महाजन आले होते त्यांना विचारा काय झाले होते.
पवारांपेक्षा माझं मन 'जे' सांगतं...
मनोज जरांगे म्हणाले, शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन ,आणि विचार ,संस्कार काय सांगतात ते महत्वाचं आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी आहे. ही माझी प्रामाणिक भावना आहे. आमच्यासह त्यांच्या लेकरांचेही कल्याण झाले तर काय हरकत आहे. आमची भूमिका ठाम आहे. वेळ प्रसंगी सर्व समाजाने एकत्र येऊन विधानसभेत पाडले पाहिजे'', असे जरांगे म्हणाले.
समाज असा झटका देईल की पश्चातापच
मनोज जरांगे म्हणाले, समाजाच्या बळापुढे कोणतीच सत्ता टिकत नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करणे ही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही जबाबदारी आहे. मात्र ते दोघे केवळ एकमेकांना बैठकीला बोलावतात. बैठकीला जात नाहीत. त्यामुळे दोघांनीही समाजाच्या बळाच्या नादी लागू नये. समाज असा झटका देईल की पश्चातापाची वेळ येईल.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications