Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, 'या' दिवशी होणार मतदान

मुंबई- विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे.

Legislative Council Elections

चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत कोणाचा गेम होणार आणि कोण विधान परिषद गाठणार याची उत्सुकता आता वाढली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. 11 जागांसाठी 12 अर्ज आले होते. शुक्रवारी 5 जुलैला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र या कालावधीत एकानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे. ही निवडणूक 12 जुलैला होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 23 मते गरजेची आहेत.

भाजपचे पाच, काँग्रेस, शिवसेने शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा प्रत्येक एक उमेदवार संख्या बळा नुसार सहज जिंकू शकतो. तर राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांना आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. तर शिंदे आणि अजित पवारांनाही आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजूळव करावी लागेल. विधान परिषदेसाठी भाजपने 5, शिवसेना शिंदे गटाने 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 2, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येक 1 उमेदवार रिंगणात उतरवले आहे.

'यांच्या'त रंगणार चुरस

या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात भाजपच्या पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यात पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत,परिणय फुके,अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना मैदानात उतरवले आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना मैदानात उतरवलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

हे आहेत डेंजर झोनमध्ये

या निवडणुकीत संख्या बळानुसार भाजपचे पाचही उमेदवार सहज विजयी होवू शकतात. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनाही कोणती अडचण नाही. काँग्रेसची अतिरीक्त मते मिलिंद नार्वेकरांच्या पारड्यात जाणार की जयंत पाटलांच्या यावर या दोघांचेही भवितव्य अवलंबून राहाणार आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागेल. सध्याच्या स्थितीत सदाभाऊ खोत,शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, जयंत पाटील आणि मिलींद नार्वेकर यांच्या पैकी एक जण डेंजर झोनमध्ये आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+