पेजर ब्लास्ट होतो, तर ईव्हीएम हॅक का नाही होणार..? निवडणूक आयोगानं दिलं सविस्तर उत्तर, तुम्हीही वाचा
Maharashtra Assembly Election 2024 : केंद्रीय निवडणूक मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका म्हटलं की, ईव्हीएमचा विषय येतोच. EVM वर सातत्याने संशय घेतला जातो. या विषयाला राजीव कुमार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत हात घातला. ईव्हीएम हॅक करुन मतांचा घोळ केला जातो, ज्याचा फायदा भाजपला होतो, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. मात्र केंद्रीय निवडणूक मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम कसं सुरक्षित आणि पारदर्शक आहे, याची सविस्तर माहिती आजच्या पत्रकार परिषदेत दिली.
ईव्हीएमबाबत काय म्हणाले राजीव कुमार
ईव्हीएमबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राजीव कुमार म्हणाले की, आमच्याकडे ईव्हीएमच्या जवळपास 20 काही तक्रारी आहेत. प्रत्येक तक्रारीचं आम्ही फॅक्ट बाय फॅक्ट उत्तर देणार आहोत. आम्ही प्रत्येक उमेदवारांना उत्तर देऊन, ते आमचं कर्तव्य आहेत. लोक आता आम्हाला विचारतात की एखाद्या देशात पेजरने ब्लास्ट घडवून आणले जातात तर ईव्हीएम कसं हॅक होऊ शकत नाही? याबाबत सांगतो की पेजर कनेक्टेड असतं. मात्र ईव्हीएम कशालाही कनेक्टेड नसतं.

कशी असते संपूर्ण प्रक्रिया?
ईव्हीएमच्या वापर कसा केला जातो, याबाबत राजीव कुमार यांनी स्पष्ट सांगितलं. ते म्हणाले की, निवडणुकीआधी पाच-सहा महिन्यांपूर्वी ईव्हीएमचं फर्स्ट लेव्हल चेकिंग होतं. फर्स्ट लेव्हल चेकिंगनंतर ईव्हीएम स्टोरेजमधून बाहेर काढणे, तपासणी करणे, मतदान केंद्रावर घेऊन जाणे, तिथे मतदानानंतर सील करणे, पुन्हा स्टोअर रुममध्ये आणणे, मतमोजणीच्या दिवशी बाहेर काढणे, सील तोडणे अशा प्रत्येक वेळी पक्षाचा, उमेदवाराची किंवा त्यासंबंधित व्यक्ती तिथे उपस्थित असतो. जेव्हा ईव्हीएम वापरासाठी काढलं जातं, तेव्हा त्यामध्ये बॅटरी टाकली जाते, असंही राजीव कुमार यांनी सांगितलं.
ईव्हीएम बॅटरीवरही होतात सह्या
मतदानाच्या 5-6 दिवस आधी जेव्हा ईव्हीएम वापरासाठी काढलं जातं, तेव्हा मशीनमध्ये चिन्ह टाकली जातात. त्याचवेळी मशीनमध्ये बटरी टाकली जाते. या प्रक्रियेदरम्यान मशीनसह बॅटरीवर देखील उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या जातात. आम्ही कधी हा नियम बनवला होता माहीत नाही, मात्र आता तो कामी येत आहे. त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात.
स्ट्राँग रुममध्ये देखील तीन टप्प्यांची सुरक्षा असते. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवसी मशीन बाहेर काढले त्यावेळी देखील तिथे हीच प्रक्रिया असते. सगळी प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद केली जाते. मशीनचे नंबर देखील प्रतिनिधींना शेअर केले जातात. पूर्ण दिवस मतदानानंतर देखील प्रत्येक टप्प्यात पारदर्शक प्रक्रिया होते, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे -
संभाजीनगरात पंचायत समिती निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; अंबादास दानवेंचा भाजप उमेदवारावर हल्ला












Click it and Unblock the Notifications