100 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी; केंद्र सरकार 'X'वर संतापले, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई कधी?
मागील काही दिवसांपासून भारतीय विमान कंपन्यांच्या 100 पेक्षा अधिक विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या सोशल मीडियावर धमक्या मिळाल्या. त्यामुळे अनेकदा विमान प्राधिकरणाला इर्मजन्सी लॅंडिंग करावे लागले. तर काल मंगळवारी देखील इंडिगो, विस्तारा आणि एअर एअर इंडियाच्या 30 फ्लाइट्सना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या.
या घटनेनंतर आता केंद्रसरकार पुन्हा अॅक्टीव्ह झाले आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अशा अफवा सातत्याने पसरवल्या जात असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी, अशा सूचना त्यांनी केल्या, आतापर्यंत तुम्ही काय कारवाई केली असा सवाल देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सहसचिव संकेत एस भोंडवे यांनी बुधवारी (23 ऑक्टोबर) एअरलाइन्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत ज्यामध्ये X आणि Meta सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडिया हे जाहीरातीप्रमाणे काम करत आहे, अशा प्रकारच्या घटनांवर गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मिडिया कंपन्यांवर नाराजी
आयटी मंत्रालयाचे सहसचिव यांनी या बैठकीमध्ये सोशल मीडिया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि हे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा धोकादायक अफवा पसरवण्यापासून रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, असा सवालही त्यांनी त्या प्रतिनिधींना केला. एअरलाइन्सच्या दोन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या धमक्यांमुळे विमान कंपन्यांना सुमारे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आलेला आहे.
120 हून भारतीय विमान कंपन्यांना धमक्या
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत भारतीय वाहकांच्या 120 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. कालही इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या ३० फ्लाइट्सना अशा धमक्या आल्या होत्या. एअरलाइन्सने सांगितले की त्यांनी मानक ऑपरेटिंग प्रक्रियांचे पालन केले: अधिकार्यांना सतर्क केले गेले आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले गेले.
प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड नाही
दरम्यान, सोमवारी परिस्थितीबद्दल माहिती देताना नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू म्हणाले होते की, प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड न करता सरकार त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की अशा फसव्या धमक्या प्रसारित करणाऱ्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यासह कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
नागरी विमान वाहतूक कायद्याच्या विरुद्ध बेकायदेशीर कायद्याच्या दडपशाहीमध्ये सुधारणा करण्याची सरकारची योजना आहे. जेणेकरून विमान जमिनीवर असताना गुन्ह्यांसाठी कारवाई सुरू करता येईल. सध्या, विमान वाहतूक सुरक्षेचे नियम मोठ्या प्रमाणावर इन-फ्लाइट गुन्ह्यांचा समावेश करतात. या कायद्यांमध्ये आम्ही दुरूस्त्या करण्याचा प्रयत्न करत आहोत.
धमक्यांमागे षडयंत्र असल्याची शक्यता?
विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांना या धमक्यांमागे काही षडयंत्र असू शकते का, असे माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, सखोल तपास केल्याशिवाय असे काही म्हणता येणार नाही. या फसव्या धमक्या असल्या तरी त्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून चेकपॉईंटवर अधिक तपासणी केली जात आहे. "आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली आहे जेणेकरून विमानतळांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येईल."












Click it and Unblock the Notifications